Skip to main content

तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई आहेत - जय पाटील


तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई आहेत - जय पाटील


पुणे न्यूज एक्सप्रेस :

बारामती: मुस्लीम समाजातील तळागळातील लोकांसाठी निस्वार्थपणे झटणारे आलताफभाई सय्यद असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील यांनी व्यक्त केले.मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे उन्नती मुदत कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या वतीने आलताफ सय्यद यांचा आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी श्री.पाटील बोलत होते. 



यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर युवकाध्यक्ष अविनाश बांदल, मुस्लिम समाजातील ज्येष्ठ हाजी शब्बीर कुरेशी, मा.उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद, मा.नगरसेवक सुरज सातव, कुंदन लालबिगे, संतोष जगताप, कसबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जमीर इनामदार, हाजी युसूफ इनामदार, सादिक मोमीन, निसार शेख, जाकीर तांबोळी, हाजी रशिद बागवान, कारी साहब, मुक्ती सरवत, तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले की, समाजसेवा म्हणजे दबलेल्या, पिचलेल्यांना हात देणे त्यांना उभे करणे हे काम आलताफभाईंनी केले व करीत आहेत. रईस चित्रपटाचे उदाहरण देत ते म्हणाले, शाहरूख खान आपल्या जवळच्या लोकांची वेगळे अस्तित्व बनवितो त्याच पद्धतीने समाजासाठी एक जागा घेऊन त्याठिकाणी घरकुल योजना राबविण्याचा त्यांचा मनोदय असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत येणार्‍या काळात त्यांना योग्य ती मदत केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.



.

याप्रसंगी तैनुर शेख, हाजी शब्बीर कुरेशी, अविनाश बांदल, तानाजी पाथरकर इ. मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना आलताफ सय्यद म्हणाले की, आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामांपैकी हे काम खूप किचकट होते. महाराष्ट्र शासनाकडून शहरात 2 कोटी रूपये आणणे ही सोपी गोष्ट नव्हती. राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्याने त्यांचे स्वीव सहाय्यक राम चोबे व हनुमंत पाटील यांच्या मदतीने व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लालमियॉं शेख यांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांनी वेळोवेळी कर्जाचे हप्ते भरून महामंडळास सहकार्य केल्यास तुमची पत महामंडळात निर्माण करावी असेही त्यांनी शेवटी सांगितले. मुस्लिम समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना एकत्रित करून भूखंड खरेदी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व त्या भूखंडावर घरे बांधण्यासाठी साहेब, दादा व ताईंच्या माध्यमातून घरकुल योजना राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular Posts

डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार

डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार   २० ऑगस्ट  रोजी पुण्यात राष्ट्रीय पुरस्कार वितरण. पुणे न्यूज एक्सप्रेस  पुणे : डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.शैक्षणिक,सामाजिक,सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.सन्मानचिन्ह,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.   महाराष्ट्राच्या  सर्व जिल्ह्यातील,समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचाही सत्कार या देशपातळीवरील  कार्यक्रमात करण्यात येणार आहे.'प्रेस मीडिया लाईव्ह' संस्थेच्या वतीने हा पुरस्कार २० ऑगस्ट २०२३ रोजी , दुपारी १२ वाजता,आझम कॅम्पस येथे होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे.'प्रेस मीडिया लाईव्ह' संस्थेचे प्रमुख  मेहबूब सर्जेखान यांनी पत्रकाद्वारे  ही माहिती दिली. 

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट पुणे न्यूज एक्सप्रेस :      इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज सोमवार दि.१८सप्टेंबर रोजी शहरातील सांगली रोड नजीकच्या कचरा डेपो आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह संपूर्ण परिसराची  पाहणी केली.       वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, स्वच्छता निरीक्षक संजय भोईटे आणि कंपनीचे प्रतिनिधी यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, लिचड ट्रीटमेंट केंद्र आणि बायोमिथेनेशन केंद्रा बाबतची सविस्तर माहिती दिली.   स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे  सर्व प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्वच प्रकल्प पुर्ण क्षमतेने आणि गुणवत्तापुर्वक रित्या सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्त यांनी आरोग्य अधिकारी यांना दिल्या. तसेच त्याठिकाणी अद्यापही कार्यान्वित न झालेले लिचड ट्रीटमेंट केंद्र तातडीने सुरू करणेचे आदेश संबंधित कंपनी च्या प्रतिनिधींना दिले.    यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, माहिती व ज...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळाचे उदघाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळाचे उदघाटन  पुणे न्यूज एक्सप्रेस :        इचलकरंजी दि.९ : येथील श्रीमती आं.रा.पाटील कन्या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "अर्थतज्ञ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळ' व   माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अर्थशास्त्र मंडळाच्या उदघाटन प्रसंगी अर्थशास्त्राचे जनक अँडम स्मिथ यांच्या जीवनकार्यावरील भित्तीपत्रिकेचे उदघाटन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलाताना त्यांनी अँडम स्मिथ यांचे अर्थशास्त्रातील योगदान किती महत्वपूर्ण आहे याविषयी माहिती दिली. अर्थशास्त्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे भारतीय अर्थ व्यवस्थेतील एक महत्वाचा पैलू असल्याने अर्थशास्त्र मंडळाचे नामकरण अर्थतज्ञ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळ असे केल्याचे प्राचार्या प्रो.डॉ. त्रिशला कदम यांनी स्पष्ट  केले. यावेळी या मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.अर्थशास्त्र  विभागातील कु. प्रियांका सागर हिची  अध्यक्ष तर ऋतुजा हरसुरे हि...