Skip to main content

शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

 शांताराम बापूंना बाराव्या  स्मृतीदिनी विनम्र अभिवादन


पुणे न्यूज एक्सप्रेस : 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com


समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा  स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत होते. कमालीची साधी राहणी, वक्तशीरपणा, विचारातील स्पष्टता आणि बोलण्यातील मार्मिकता इत्यादी अंगभूत वैशिष्ट्यांसह बापू अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी थोर  विचारवंत नेते कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्यासह आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद असलेल्या ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ची ११ मे १९७७ रोजी स्थापना केली.

वयाच्या आठव्या वर्षीच स्वातंत्र्य आंदोलनातील वातावरणाने आणि वडील बंधूंच्या प्रेरणेतून बापू बालवीर म्हणून या आंदोलनात उतरले.त्यांना वक्तृत्वाची जन्मजात देणगी होती. त्याला निरीक्षण व अभ्यासाची जोड देण्याची त्यांची स्वयंशिस्त होती. त्यांच्या बोलण्यात ,लिहिण्यात आणि वागण्यात ती शिस्त अखेरपर्यंत होती. विचारांवर अधिष्ठान ठेवून जे सातत्य त्यांनी जपले तो त्यांचा खरा मोठेपणा होता. बापूंना ‘ प्रबोधकांचे प्रबोधक ‘ म्हणून जी लोकमान्यता मिळाली होती ती त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून मिळालेली होती.

विद्यार्थी दशेत राष्ट्र सेवा दल ,काँग्रेसचा १९४२ चा लढा, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष ,मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष अशी राजकीय वाटचाल वयाच्या पन्नाशीपर्यंत त्यांनी केली. आणीबाणीनंतर अपक्ष पातळीवरील ‘ ‘ समाजवादी प्रबोधिनी’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली. आणीबाणी लादली गेल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ होते.त्यांची मने सैरभैर झाली होती.त्याच बरोबर १९६० नंतरच्या काळात राजकीय पक्षांच्या बांधणीतही कमालीचे दोष दिसू लागले होते. ज्यांच्या सहकार्याने राजकारण करायचे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या योग्य प्रबोधनाचा अभाव होता. त्यामुळे समाजजीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती.ही पोकळी भरून काढावी व जिज्ञासू कार्यकर्त्यांचे ,समाजाचे प्रबोधन करावे या हेतूने हे अपक्षीय ज्ञानपीठ तयार झाले.

राष्ट्र सेवा दला पासून प्रबोधिनीपर्यंतच्या सर्व प्रवासात प्रत्येक टप्प्यावर बापूंनी स्वतःची अशी एक अमिट मुद्रा उमटवलेली आहे. पक्की वैचारिक बैठक असलेल्या बापूंच्या उक्ती आणि कृतीत फरक नव्हता. ” विचार पेरा कृती उगवेल ,कृती पेरा सवय उगवेल, सवय पेरा चारित्र्य उगवेल आणि चारित्र्य पेरा भविष्य उगवेल ” असे एक वचन आहे. बापूंचा जीवनपट या वचनाला सार्थ ठरविणारा आहे.

समाजवादी प्रबोधिनीला येत्या मे महिन्यात ४७ वर्षे पूर्ण होतील. १९८५ पासून मी बापूंचा एक तरुण सहकारी, त्यांच्या प्रमाणेच एक पूर्णवेळ कार्यकर्ता आणि सर्वार्थाने त्यांचा मदतनीस म्हणूनही अखेरपर्यंत त्यांच्या अतिशय निकट होतो. आज बापूंना जाऊन बारा वर्षे झाल्यानंतरही त्यांच्याबरोबरच्या त्या सव्वीस वर्षांच्या वाटचालीतील क्षण न क्षण माझ्या डोळ्यांसमोर उभा आहे.कारण तो माझ्या अखंड तारुण्याचा कालखंड आहे.प्रबोधिनीच्या उभारणीसाठी, विविध उपक्रमांची आखणी करण्यासाठी बापूनी प्रचंड कष्ट घेतले. धावपळ केली. त्या कष्टांचा मी सहकारी साक्षीदार आहे.अर्थात त्या धावपळीने दमछाक न करता नेहमीच अजून गतीने काम केले पाहिजे हेच सांगितले. मी विद्यार्थिदशेत असताना समाजवादी प्रबोधिनीच्या कामात पूर्णवेळ पूर्णतः झोकून देण्याची इच्छा मनात प्रज्वलित करण्यापासून ते गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळण्याच्या अनेक संधी चालत येऊनही ते तथाकथित स्थैर्य नाकारण्याची क्षमता माझ्यात निर्माण करण्यापर्यंत आणि माझ्यातील लेखक, अभ्यासक, वक्ता, संपादक घडवण्यापासून ते त्यांच्या हयातीतच सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने प्रबोधिनीचे काम पुढे चालवण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यापर्यंतच्या प्रत्येक क्षणाचे शिल्पकार शांतारामबापूच होते.

२००२ साली शांतारामबापूंचा अमृतमहोत्सव झाला. त्या दिवसापासून शांतारामबापूंनी समाजवादी प्रबोधिनीची सर्वप्रकारची संपूर्ण धुरा माझ्यावर सोपविली आणि दैनंदिन कामातून ते पूर्णतः बाजूला झाले.आज याही गोष्टीला बावीस वर्षे होत आली आहेत.माझी संस्थेच्या एकूण कामातली अडतीस वर्षे, त्यातील सर्व प्रकारच्या संपूर्ण जबाबदारीची बावीस वर्षे आणि बापूंशिवायची बारा वर्षे हा प्रदीर्घ पट उलगडतांना माझे मलाही अचंबित व्हायला होते.आज बापूंचा बारावा स्मृतिदिन होत असताना ही वाटचाल अधिक ऊर्मीने करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे यात शंका नाही.

अदम्य जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती ही बापूंच्या कणखर व्यक्तिमत्त्वाचा भाग होती. नाहीतर एरवी क्षयापासून चे हृदय विकारापर्यंतच्या रोगांनी आणि अपचनापासून ते धापेच्या तक्रारी शरीरात तब्बल चाळीस वर्षे ठाण मांडून बसलेल्या असतानाही त्यांचे सातत्यपूर्ण काम स्तिमित करणार होते. बापूंनी वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून प्रचंड प्रबोधन केले .एक वचन आहे की, ” विद्वानाची शाई ही हुतात्म्याच्या रक्ताहून अधिक पवित्र असते “.बापूंनी तर स्वातंत्र्य आंदोलनात हुतात्म्यांच्या रक्ताचे महत्व जाणले होते. कष्टकऱ्यांचे पक्षीय आंदोलन करतानाही त्यांनी त्याचे महत्त्व ओळखले होते. आणि त्यांचे लेखन हे एका विद्वानाचे विचारवंतांचे चिंतनशील लेखन होते.

प्रबोधनाच्या कामाला संस्थात्मक रूप देण्यामागे बापूंची पक्की भुमिका होती.समाज प्रबोधन ही समाजजीवनात सातत्याने व नियमित चालवणे आवश्यक असणारी प्रक्रिया आहे.कोणत्याही प्रक्रियेमागे सैद्धांतिक आधार आणि मार्गदर्शन तसेच नियंत्रणे असल्याशिवाय ती उपयुक्त,फलदायी व यशस्वी ठरत नाही. व्यवहारवादाच्या नावाखाली हे नाकारण्याचा प्रयत्न ही दुसऱ्या बाजूला सुरू असतो. अर्थात, विकासप्रक्रियेतील एक अंतर्विरोध असे समजून त्याचेही निराकरण करावे लागते.हे निराकरण करताना ,प्रबोधनाकरता विषयांची व क्षेत्रांची निवड करताना अग्रक्रमांची निवड जेवढी अचूक केली जाते, तेवढे विकासप्रक्रियेचे काम परिणामकारकपणे पार पडते.हे सूत्र आधारभूत धरूनच समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली.त्यानुसार प्रबोधनाची कार्यपद्धती तयार केली.

समाज प्रबोधनामध्ये लोकजागृती ही परिणामाच्या टप्प्यावरील परिणती मानावी लागेल. कार्यकर्त्यांची सैद्धांतिक भूमिकेशी बांधिलकी आणि जनजीवनाच्या प्रत्यक्ष अवस्थेत ती भूमिका पोहोचविणे व रुजविणे यासाठी निवडावयाची व अवलंबावयाची कार्यपद्धती ठरवणे आणि त्यानुसार प्रत्यक्ष कार्यरत राहणे हा संस्थेच्या कार्याचा मुख्य असावा लागतो, असे मानून अशा कार्यकर्त्यांचे व जिज्ञासुंचे संघटन करण्याला अग्रक्रम देण्यात आले.व्यक्तिगत संपर्क,विचार विनिमय आणि सोयीच्या वेळापत्रकानुसार कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. त्यामध्ये व्यक्तिगत गाठीभेटी, चर्चा यांना गरजेप्रमाणे वाव व प्राधान्यही ठेवण्यात आले.त्याचबरोबर साप्ताहिक ,पाक्षिक अशा नियमित बैठका,प्रचलित प्रश्नांवरील सततची व्याख्याने ,परिसंवाद ,चर्चासत्रे, वार्षिक व्याख्यानमाला ,वाचनालयांची उभारणी असे अनेक उपक्रम संस्थात्मक प्रबोधनाला उपयुक्त ठरतात हे गेल्या ४६ वर्षाच्या समाजवादी प्रबोधिनीच्या वाटचालीतून दिसून आले आहे. त्यामागे बापूंचा द्रष्टेपणा महत्वाचा होता.

प्रबोधनाचे एक प्रभावी व परिणामकारक माध्यम म्हणून प्रबोधिनीने पहिल्यापासूनच पुस्तिका ,पुस्तके ‘ मुद्रण खर्चात व पुनर्मुद्रणाचा मुक्त परवाना ‘ या वैशिष्ट्यांसह प्रकाशित केली. या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून जानेवारी १९९० पासून ” प्रबोधन प्रकाशन ज्योती ” हे मासिक सुरू केले.गेली ३४ वर्षे अतिशय नियमितपणे हे मासिक सुरू आहे. गेल्या ४५ वर्षात समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने अंदाजे सत्तावीस हजारांहून अधिक छापील पृष्ठांचे प्रबोधन साहित्य, सकस वैचारिक शिदोरी दिली गेली आहे.महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठानी या नियतकालिकाला ‘ मान्यताप्राप्त नियतकालिक ‘ म्हणून मान्यता दिलेली आहे. या मासिकावर मुंबई विद्यापीठात पीएचडी व एम.फिल. हे प्रबंध सादर होऊन त्यांना पदव्याही जाहीर झाल्या आहेत.गेली वीस वर्षे मी या मासिकाचा ‘ संपादक ‘आहे.या काळात मी साडेतीन हजारांवर छापील पृष्ठांचे ‘संपादकीय ‘ लिहिले आहे.अर्थात पहिल्या अंकापासूनच मी यात सक्रिय आहेच.ही माझ्या अभिमानाची बाब आहे. हे शांतारामबापू यांच्यामुळे आहे याची नम्र जाणीव आज त्यांच्या बाराव्या स्मृतिदिनी आहे.

तत्पूर्वी १९८४ साली ‘प्रबोधन वाचनालय ‘ समाजवादी प्रबोधिनीने स्थापन केले. आज या ग्रंथालयात साहित्याच्या सर्व प्रकारची ३१ हजार पुस्तके आहेत. त्यामध्ये समृद्ध असा संदर्भ विभाग आहे.तीन हजारावर पुस्तकांचा स्वतंत्र बाल विभाग आहे. शंभरावर दैनिके – नियतकालिके यांनी समृद्ध असा मोफत वाचन विभागही आहे.याचा लाभ दररोज शेकडो वाचक घेत असतात.याशिवाय इतर अनेक सातत्यपूर्ण उपक्रम सुरू असतातच. अभ्यासिका उभारणीचे प्रयत्न सुरू आहेत.

भारताचा प्रदिर्घ स्वातंत्र्यलढा समाजवादी समाजरचनेच्या दिशेने वाटचाल करत होता. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतील सरनाम्यात संपूर्ण स्वातंत्र्य ,लोकांचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि संघराज्यीय एकात्मता या पायाभूत संकल्पनांच्या आधारावर समाजवादी समाजरचनेचा इमला उभारण्याचे आपण आग्रहपूर्वक जाहीर केलेले आहे. भारतीय परिस्थितीचे, विशेषतः या समाजजीवनातील विकसनशील व गतिशील अंगोपांगांचे शास्त्रीय व वास्तव मूल्यमापन करून समाजवादी समाजरचनेच्या दिशेने आपले परिवर्तनाचे प्रयत्न जाणीवपूर्वक चालवणे ,हे ते उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग आहे.यासाठी या पायाभूत संकल्पनांची आणि वैज्ञानिक समाजवादाची जाण असलेले आणि तशी मानसिकता तयार झालेले कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी प्रत्येक क्षेत्रात निर्माण करणे हा प्रबोधिनीचा मुख्य उद्देश आहे. ही बापूंची धारणा होती.त्यांच्याबरोबर पाव शतकांहून अधिक काळ एकत्र काम केल्याने बरेच काही शिकता आले.

प्रबोधकांचे प्रबोधक असलेले बापू वयाच्या ८५ व्या वर्षी शनिवार ता. ३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. अनारोग्याने ग्रासलेले आणि कृश झालेले आपले शरीर कोणत्याही कर्मकांडाविना दहन करावे आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून मीच अग्नी द्यावा ही इच्छा त्यांनी अनेकदा व अनेकांशी व्यक्त केली होती.आपण त्या इच्छेचा सन्मान केला.

गेल्या बारा वर्षाच्या काळावर नजर टाकली तर हा काळ सैद्धांतिक प्रबोधनाच्या अत्यंत गरजेचा आहे यात शंका नाही.पण त्याचवेळी या काळाने फार मोठी आव्हानेही उभी केली आहेत.भारतीय दर्शन परंपरा,भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यलढ्याचा आशय ,राज्यघटनेचे तत्वज्ञान या सगळ्यांवरच अत्यंत वेगाने व तीव्रतेने हल्ले होत आहेत. हे हल्ले करणारे दिवसेंदिवस अधिक संघटित होत आहेत, येन केन प्रकारेण सत्ता मिळवत आहेत, स्थिर व शिरजोर होत आहेत. दुसरीकडे त्यांच्या प्रतिगामीत्वाला विरोध करणारे व स्वतःला पुरोगामी मानणारे आपसातच लढत आहेत.आम्ही सारे एक आहोत म्हणणारेच जेंव्हा व्यक्तिवादाने किंवा व्यक्तिद्वेषाने पछाडलेले असतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या संस्थेवर, संघटनेवर होत नसतो तर संपूर्ण पुरोगामी चळवळीवर होत असतो.समाजाचा विश्वास गमावला जात असतो. याचे भान ठेवणे ही काळाची गरज आहे.

प्रबोधन,परिवर्तन संथपणे पण मूव्हमेंटनेच होत असते.इव्हेंटने नव्हे याचे भान आपण सर्वांनी ठेवले नाही तर खरंच येणारा काळ खरंच माफ करणार नाही. पक्के वैचारिक अधिष्ठान असलेली आकाशाच्या उंचीची माणसे आता कमी होत आहेत.आणि खुज्यांची चलती आहे. हे वेळेस थांबले नाही तर केवळ पूर्वजांच्या जयंत्या आणि मयंत्या साजऱ्या करत राहण्याची आणि दुसरीकडे विचार कमजोर होऊन झालेला पाहण्याची अधिक भयावह वेळ येऊ शकते. पुरोगामी चळवळीने भारतीय संविधानाचे तत्वज्ञान हा विषय प्रबोधनाचा म्हणून अग्रक्रमाने घेतला पाहिजे हे ४६ वर्षांपूर्वी सर्वप्रथम ओळखणारे व ते समाजवादी प्रबोधिनीच्या माध्यमातून कृतीत आणणारे शांतारामबापूच होते.आणि दीड दशकांपूर्वी अण्णा हजारे यांचा उदय झालेले व राजकीय पक्षांना नावे ठेवत सुरू केलेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे तद्दन राजकीय आंदोलन आहे, ते अशास्त्रीय आहे, तुमचा अंतस्थ हेतू शुद्ध नाही हे शांतारामबापूंनी त्यावेळी खुद्द अण्णा हजारे यांना सुनावले होते.मी त्याचा साक्षीदार आहे.अण्णांची जाग आणि झोप सोयीनुसार असते हे गेल्या अनेक वर्षात दिसून आले.त्यांची सोयीनुसार भाषा कोणत्या गांधीवादात व नीतिमत्तेत बसते हे त्यांनी सांगितले नाही तरी आपण ओळखले पाहिजे.पुरोगामी ,प्रबोधनाच्या चळवळीतील प्रत्येकाने खऱ्या अर्थाने कृतिशील पद्धतीने विवेकनिष्ठ,विचारनिष्ठ झालेच पाहिजे हा शांतारामबापूंचा आग्रह त्यांच्या बाराव्या स्मृतिदिनी तीव्रतेने पुन्हा पुन्हा ध्यानात घेतला पाहिजे व कृतीत आणला पाहिजे ही काळाची मागणी आहे.शांतारामबापूंच्या निधनानंतर प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण दशकभराची वाटचाल केली. एन.डी.सरही गेले.पाठोपाठ जे. एफ.पाटील सरही गेले.समाजवादी प्रबोधिनीच्या संस्थापकांतील सर्व शिलेदार आपण गमावले आहे.अशावेळी आपले संस्थात्मक लोकप्रबोधनाचे काम आपण सर्वार्थाने विकसित करण्यासाठी आपल्या सर्वांगिण भागीदारीसह कटिबद्ध राहणे हीच त्यांना खरीआदरांजली ठरेल.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Comments

Popular Posts

मर्चंट नेव्ही कॅप्टन मनालची मरीन अकादमी कार्यालयास पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान , व मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद यांनी सदिच्छा भेट दिली.

  पुणे न्यूज एक्सप्रेस :   पुणे : मर्चंट नेव्ही  कॅप्टन मनालची मरीन अकादमी कार्यालयास पुणे न्यूज एक्सप्रेस चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान , व मोहम्मद  गौस उर्फ बबलू सय्यद  संचालक मुस्लिम बँक व चेअरमन  रिकवरी डिपार्टमेंट  यांनी सदिच्छा भेट दिली.  या वेळी : मर्चंट नेव्ही चे मुख्य  मोहसीन शेख  यांनी स्वागत केले. त्या वेळी येथील  मर्चंट नेव्ही विद्यार्थि  यांचे शी  चर्चा करून कामाविषयी माहिती घेतली

सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड

  सय्यद मुख्तार अली को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड पुणे ( मोहम्मद जावेद मौला)  :  एंग्लो उर्दू बॉईज परिवार की जानिब से एंग्लो उर्दू हाई स्कूल के रिटायर्ड स्पोर्ट टीचर सय्यद मुख्तार अली हादी को पिछले दिनों बुध 19 सितंबर  2023  को सुबाह 11 बजे गोल्डन ज्युबिली कॉफ्रन्स हॉल में प्रोग्राम के सदर शाहिद इनामदार ( प्रेसिडेंट गोल्डन ज्युबिली इज्युकेशन ट्रस्ट)  के हाथों लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड से नवाजा गया. एस. ए. इनामदार (वाइस चेरमन मुस्लिम बैंक और चेरमन एंग्लो उर्दू बॉईज हाई स्कूल) महेमाने खुसूसी थे. इस मौके पर राज मुजावर ( प्रिंसिपल एग्लो उर्दू हाई स्कूल), जाहेदा शाहिद इनामदार( प्रिंसिपल हाजी गुलाम मोहम्मद आज़म उर्दू प्रायमरी स्कूल) वहीद बियाबानी, अजय कुलकर्णी, इबराहीम शेख  अल्ताफ शेख, प्रोग्राम के कन्वीनर लाइक अली मुजावर, गुलाम अली काजी और कसीर तादाद में एंग्लो उर्दू के स्टूडेंट्स, स्टेट और नेशनल खिलाड़ी मौजूद थे. प्रोग्राम का आगाज़ मौलाना सादिक के तिलावते कुरआन पाक से हुवा इस के बाद सय्यद मुख्तार अली हादी को लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड से नवाजते हुए सदारती खुतबे...

इचलकरंजीतील पंचगंगा नदीत झालेल्या होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या हजरत सय्यद बादशहा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला.

पुणे न्यूज एक्सप्रेस :   इचलकरंजी, प्रतिनिधी - क्रिकेट, फुटबॉल यासह अनेक विदेशी खेळ पाहणारे शौकीन वाढत आहेत. मात्र आता देशी खेळांना व्यापक स्वरुप आणणं, देशी खेळ खेळणार्‍या खेळाडुंना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळं होड्यांच्या शर्यतीला प्रोत्साहन म्हणून श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीनं होणार्‍या दरवर्षीच्या होड्यांच्या शर्यतीसाठी 51 हजाराचं बक्षिस देण्याचं खासदार धनंजय महाडीक यांनी जाहीर केलं. दरम्यान भक्त मंडळाच्यावतीनं इचलकरंजीतील पंचगंगा नदीत झालेल्या होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या हजरत सय्यद बादशहा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला.            श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्यावतीनं होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमीत्तानं आलेल्या खासदार महाडीक यांनी वरदविनायक मंदिरात श्रींची आरती केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाचे संस्थापक मल्लय्य स्वामी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून होड्यांच्या शर्यती व्हायच्य...

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी

  चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पहाणी उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करण्याच्या  सूचना पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे  : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामास भेट देऊन  पाहणी केली.  उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने श्री. पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा अट रद्द करा

  या मागणी करिता पॅंथर आर्मीचे आझाद मैदान मुंबई येथे 20 जुलै रोजी आंदोलन पुणे न्यूज एक्सप्रेस :  मुंबई प्रतिनिधी : अनुसूचित जाती व नव बौद्ध भूमीहीन शेतमजुरांना सबल करणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा बागायती करिता आठ लाख रुपये व जिरायती करिता पाच लाख रुपये ही अट रद्द करून बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात या मागणी करिता पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे 20  जुलै रोजी आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रीय कार्यकारी प्रमुख संतोष आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना दिले आहे. महाराष्ट्र राज्यातील भूमीहिंना च्या सबलीकरणाचा एक भाग म्हणून राज्य शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना सुरू केली पण यंत्रणेतील असंवेदनशीलतेमुळे व जाचक अटी मुळे भूमिहीन शेतमजूर शेतमालक बनणारी योजना म्हणावी इतकी प्रभावी ठरू शकली नाही .सामाजिक न्याय विभागाला प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून सुद्धा भूमीहिंनाच्या योजनेसाठी शूल्लक तरतूद...

ڈاکٹر نذیر فتح پوری مخمور سعیدی ایوارڈ سے سرفراز

  ڈاکٹر نذیر فتح پوری مخمور سعیدی ایوارڈ سے سرفراز पुणे न्यूज एक्सप्रेस :  محمد جاوید مولا پونہ؛ اُردو کے سینئر ممتاز ادیب ، صحافی و شاعر ، سہ ماہی اسباق کے مدیر اعلی ڈاکٹر نذیر فتح پوری کو ان کی دیرینہ ادبی صحافتی گراں قدر خدمات کے اعتراف میں راجھستان اردو اکیڈمی کی جانب سے سال  2024 2023  کے لئے مخمور سعیدی ایوارڈ سے گزشتہ دنوں گلابی شہر جے پور کے آڈیٹوریم میں منعقد عظیم الشان جلسہ عام میں نوازا گیا۔ اس موقع پر وزیر برائے ادب و ثقافت، حکومت راجھستان ڈاکٹر بی ڈی کلا،چیئرمن راجھستان اردو اکیڈمی ڈاکٹر حسین رضا خان،سیکریٹری راجھستان اردو اکیڈمی ڈاکٹر صغیر احمد اور شہر کی علمی،ادبی ،صحافتی شخصیات کثیر تعداد میں حاضر تھے۔واضح ہو کہ ‌ذاکٹر نذیر فتح پوری گزشتہ 42 برسوں سے اردو کا ایک سہ ماہی رسالہ اسباق شائع کر رہے ہیں۔ ان کی مختلف موضوعات پر اب تک 105 کتابیں شائع ہو چکی ہیں۔  موصوف کو ادب اطفال کا ساہتیہ اکیڈمی ایوارڈ بھی مل چکا ہے اس کے علاوہ متعدد قومی اور بین الاقوامی ایوارڈ سے نوازے چکے ہیں۔ 

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांची घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट पुणे न्यूज एक्सप्रेस :      इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज सोमवार दि.१८सप्टेंबर रोजी शहरातील सांगली रोड नजीकच्या कचरा डेपो आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह संपूर्ण परिसराची  पाहणी केली.       वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, स्वच्छता निरीक्षक संजय भोईटे आणि कंपनीचे प्रतिनिधी यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, लिचड ट्रीटमेंट केंद्र आणि बायोमिथेनेशन केंद्रा बाबतची सविस्तर माहिती दिली.   स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे  सर्व प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्वच प्रकल्प पुर्ण क्षमतेने आणि गुणवत्तापुर्वक रित्या सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्त यांनी आरोग्य अधिकारी यांना दिल्या. तसेच त्याठिकाणी अद्यापही कार्यान्वित न झालेले लिचड ट्रीटमेंट केंद्र तातडीने सुरू करणेचे आदेश संबंधित कंपनी च्या प्रतिनिधींना दिले.    यावेळी शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे, माहिती व ज...

नारायण देवी चॅरिटेबल संस्थेच्या वतीने शिक्षक गौरव समारंभ संपन्न

 गुणवंत शिक्षक व कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित  पुणे न्यूज एक्सप्रेस :  अन्वरअली शेख  देहूरोड शहर दि.19 शहरातील प्रख्यातसंस्था नारायण देवी चारिटेबल ट्रस्ट व ईश्वर अग्रवाल यांनी शिक्षक दिनानिमित्त अवचित साधून आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक व कर्मचारी पुरस्कार समारंभ आयोजित केले होते, या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होते, यावेळी संस्थेचे संस्थापक ईश्वर अगरवाल म्हणाले नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेल्या 38 वर्षापासून मानव हिताचे विविध उपक्रम  यशस्वीरित्या राबवित आहे, आणि या सर्व उपक्रमात माझे सहकारी विशेष दीपक चौगुले आणि इतर सर्व सहकारी माझ्या सोबत आहेत, संस्थेने करोना काळात विविध प्रकारच्या सेवा गरजू लोकांपर्यंत पोहोचविल्या  त्यावेळी प्रत्येक जण आपला जीव जपत होते अशा संकट काळात नारायण देवी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व सहकारी रस्त्यावर उतरून भुकेलेल्या लोकांना अन्न वाटप करून गोरगरिबांची सेवा केली तसेच करोना मधे  मृत पावलेल्या 22 मृतदेहाचे अंत्यविधी संस्कार संस्थेने...

समन्स ची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिसावर कारवाई

  लाच प्रकरणी अटक महिला पोलीस कॉन्स्टेबल काजल लोंढे पुणे न्यूज एक्सप्रेस :  मुरलीधर कांबळे :    कोल्हापूर- तक्रार अर्जाची निकाली काढ़लेल्या समन्स ची प्रत देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला कॉन्स्टेबल काजल गणेश लोंढ़े  ब.न.217  (वय 28 रा.बंगला नं.10 ,तिसरा मजला पार्वती कंन्सट्रकशन,सरनोबतवाडी ) असे लाच घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. या पोलिस मुख्यालयात महिला सहाय्य कक्षात गेल्या आठ महिन्यांपासून कार्यरत आहेत त्याची 2014 ला जॉईनिंग आहे.अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांनी  घरगुती कारणातुन पत्नीच्या विरोधात महिला सहाय्य कक्षाकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता तो अर्ज निकाली काढ़ण्यात आला .त्या निकाली काढ़लेल्या अर्जाची समन्सची प्रतची मागणी केली असता महिला कॉ.काजल लोंढ़े यांनी प्रत देणेसाठी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलूचपत विभागाने पडताळणी करून सापळा रचून सदर काजल लोंढ़ेला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई केली. या कामी लाचलुचपत सांगली पोलिसांची ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळाचे उदघाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळाचे उदघाटन  पुणे न्यूज एक्सप्रेस :        इचलकरंजी दि.९ : येथील श्रीमती आं.रा.पाटील कन्या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "अर्थतज्ञ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळ' व   माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अर्थशास्त्र मंडळाच्या उदघाटन प्रसंगी अर्थशास्त्राचे जनक अँडम स्मिथ यांच्या जीवनकार्यावरील भित्तीपत्रिकेचे उदघाटन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलाताना त्यांनी अँडम स्मिथ यांचे अर्थशास्त्रातील योगदान किती महत्वपूर्ण आहे याविषयी माहिती दिली. अर्थशास्त्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे भारतीय अर्थ व्यवस्थेतील एक महत्वाचा पैलू असल्याने अर्थशास्त्र मंडळाचे नामकरण अर्थतज्ञ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र मंडळ असे केल्याचे प्राचार्या प्रो.डॉ. त्रिशला कदम यांनी स्पष्ट  केले. यावेळी या मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.अर्थशास्त्र  विभागातील कु. प्रियांका सागर हिची  अध्यक्ष तर ऋतुजा हरसुरे हि...