Skip to main content

चांद्रयान मोहिमेचे यश अतुलनीय :डॉ पी ए इनामदार



पुणे न्यूज एक्सप्रेस : 

पुणे : चांद्रयान मोहिमेचे भारताचे यश अतुलनीय असून प्रगत देशांच्या श्रेणीत भारत जाऊन बसला आहे.भारताचे शास्त्रज्ञ,इस्त्रो  सारख्या संस्था आणि पं.नेहरूंपासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधान यांना हे श्रेय जाते.एक भारतीय म्हणून सर्वांना हा अभिमानाचा क्षण आहे.अनेक दशकांची मेहनत,संशोधन फळास आले आहे.

विज्ञान आणि संशोधनाला या यशामुळे प्रेरणा मिळेल.शैक्षणिक संस्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन,विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधनाला प्राधान्य देणे सर्वांगीण प्रगतीसाठी हितकारक ठरेल',अशी प्रतिक्रिया 'डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ पी ए इनामदार यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

दरम्यान,चांद्रयानाच्या मोहिमेचे थेट प्रक्षेपण आझम कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. 







Comments

Popular Posts

उपनिबंधकांनी कर्नल विनायक केळकर आणि राजिब बासू वर घातली बंदीः

  उंड्रीतील न्याती सह. गृहनिर्माण सोसायटीतील प्रकरण.  पुणे न्यूज एक्सप्रेस :  पुणे :  पुण्यातील मार्केट यार्ड येथील श्री दिगंबर हौसारे - उपनिबंधकांनी उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील विनायक केळकर आणि राजीव बसू यांच्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत व तसे  अंमलबजावणी  साठीचे पत्र   सोसायटीच्या  चेअरमन  आणि सेक्रेटरीना पाठविण्यात  आले आहे.  उंड्री (ता. हवेली) येथील न्याती ग्रॅन्ड्युअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे केळकर आणि  बासू  सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, मुख्य कन्व्हेयन्स डीड प्रकरणांमध्ये लुडबूड करीत आहेत. कन्व्हेयन्स डीड प्रक्रियेमध्ये एफएसआय आणि टीडीआरचा वाटाघाटींचा समावेश असून,त्याचे मूल्य ५० कोटींनच्या पेक्षाही जास्त आहे. त्यातील मुख्य सूत्रधार केळकर न्याती बिल्डर्ससमवेत पूर्वी नोकरी केल्यामुळे जोडलेला आहे व आजही सोसायटीमधील सगळी माहिती तो बिल्डरला वेळोवेळी पुरवीत असतो व बिल्डरच्या  इशाऱ्याप्रमाणे  इथले कामकाज चालवीत असतो.विशेष म्हणजे केळकरच...